Wednesday, December 1, 2010

Political Pressure group: राजकीय दबावगट

Political Pressure group: राजकीय दबावगट
दबावगट ही आधुनिक राजकारणातील एक अत्यंत प्रभावी आणि महत्वपूर्ण शक्ती गणली जाते. आल्फ़्रेड-डी-गाझा यांच्या मते संपूर्ण राजकारण हे हितसंबधी गटांचे राजकारण झाले असून ते शासन व्यवस्थेवर प्रभाव पाडून आपल्या मागण्या मान्य करुन घेतात. सार्वजनिक जीवनावर परिणाम घडवून आणणाऱ्या कोणत्याही खासगी किंवा अराजकीय गट म्हणजेच दबावगट.फ्रान्सिस केसल्स यांनी दबावगटाच्या विविध व्याख्या केल्या आहेत. राजकीय दबावगट हे आर्थिक, धार्मिक, व्यावसायिक, भाषिक व वांशिक अशा वेगवेगळे गट पडलेले दिसतात. विशेषत: शासनसंस्थेवर या संघटनांचा प्रभाव जाणवतो. कामगार संघटना, अल्पसंख्य धार्मिक गट, उदयोजक वर्ग अशा संघटना आपल्या हितासाठी अनेक मागण्या करतात. त्यासाठी सरकारने विशिष्ट धोरणाचा पुरस्कार करावा म्हणुन जनमत जागृत करतात.याच गटांचा सरकारवर प्रभाव असण्याची शक्यता जास्त असते.
उदा. हरियाण्यातील राजकारणावर जाटांचा तर महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा प्रभाव जाणवतो.
सरकारने एखादा कायदा करावा किंवा करु नये तसेच एखादा निर्णय घ्यावा किंवा घेऊ नये म्हणुन हितसंबधी गट सरकारवर दबाव आणतात भाषिक प्रांतरचनेसाठी हितसंबधी गटांनी सरकारवर दबाव आणला तेव्हाच राज्यपुनर्रचना मंडळाची नेमणुक झाली. तसेच हुंडाप्रतिबंधक कायदा करावा व महिलांवरील अत्याचार थांबवावेत म्हणुन महिला संघटनांनी दबाव आणला.दबावगटांना कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसते प्रसंगानुरुप ते राजकीय पक्षांना पाठिंबा देतात. राजकीय दबावगट ही संकल्पना २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरुन अधोरेखित होते

सक्तीची भक्ती

सक्तीची भक्ती

दिवाळीच्या सुमारास ओळखीच्यांकडे जाण्याचा योग आला ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांचे घर प्रशस्त तर होतेच पण मध्यवर्ती भागात असूनही तिथे शांतता होती. जवळपास सगळेच उच्चमध्यमवर्गीय लोकच राहत होते.माझे काम तसे लगेच झाले पण त्यांनी दिलेला कपभर चहा (सदर घटना पुणे येथीलच आहे)अजून संपला नसल्याने इतर गप्पागोष्टी करत बसलो.त्यांच्या सोसायटीतुन एक रस्ता जाणार होता जो सर्व प्रमुख रस्त्यांना जोडला जाणार होता. त्यामुळे रहदारीच्या समस्या सोडवण्यास मदत होणार होती पण सोसायटीमध्ल्या लोकांनी प्रखर विरोध केल्याने त्याचे काम रेंगाळले.एवढी प्राथमिक माहिती माझ्याकडे होती पण अजून जाणून घ्यायची उत्सुकता असल्याने मी त्यांना विचारले कि त्या रस्त्याचे पुढे काय झाले? त्यावर सदर व्यक्ती मला म्हणाल्या कि हा रस्ता झाला असता तर आमच्या खासगी आयुष्यावरच गदा तर आली असतीच पण आम्हाला रस्ता पार करणेदेखील जिकीरीचे झाले असते त्यामुळे आम्ही विरोध केला आणि एका रात्रीत तिथे लहान रामाचे मंदिर बांधले त्यामुळे त्या रस्त्याचा विचारच मावळला. रामाचे मंदिर बांधल्याचे त्या व्यक्ती इतक्या अभिमानाने आणि गर्वाने सांगत होत्या कि जणू काही अयोध्येमधल्या वादग्रस्त जागेवरच राममंदिर बांधले आहे.हे सगळे एका रात्रीमधे कसे काय शक्य झाले हे विचारले असता त्यांनी सांगितले, आमच्या सोसायटीमध्ये बिल्डर,कंत्राटदार,वकील,पालिकेतील अधिकारी असे लोक राहतात त्यांनीच पु्ढाकार घेऊनच हे मंदिर बांधले गेले. रामालाही किती अप्रूप वाटले असेल या भक्तीचे आणि team work चे तर हे एक उत्तम उदाहरण ठरु शकेन. केवल विरोधाला विरोध किती घातक आहे. जिथे सुशिक्षित समाजच काही विचार न करता लहानसहान विकासकामांना खो घालत असेल तिथे मोठमोठया विकासकामांबद्दल न बोललेच बरे.