आम्ही अट्टल चहाबाज,चोवीस तासात केव्हाही चहा घेऊ शकणारे.कधीही विचारले तरी चहा घ्यायला सदैव तयार बर अर्धाच कप दया,मी आत्ताच घेतला आहे असली वाक्ये आम्ही टाळतोच. का कोण जाणे चहावरच्या या प्रेमाखातर चहाच्या अतिसेवनामुळे होणारी acidity कधी होत नाही.दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो असे म्हणतात पण जर दिवसाची सुरुवात जर चहाने झाली तर दिवस अधिक चांगला जातो.सकाळचा चहा आणि त्याबरोबर वाचायला पेपर याची मजा काही औरच. सर्व सरकारी कचेऱ्या,कार्यालये,विविध खाती यामधे चहापाणी हा समान दुआ आहे.तिथे चहापाणी घेतल्याशिवाय काम होत नाही म्हणजे कामाला हात लावत नाही इतके त्यांचे चहावर प्रेम असते. चहा हे उत्तेजक पेय आहे पण त्याला काळवेळ याचे बंधन नसते. दुसरे उत्तेजक पेय ठरविक वेळीच पिण्यात मजा असते.पण चहा प्यायला काळाचेच काय कारणांचे ही बंधन लागत नाही. थकल्याभागल्यावर किंवा सकाळीउठल्यावर, मिटींगमधे, लेक्चरनंतर, परिक्षा चालू असतांना, ट्रेकींग करतांना चहा हा हवाच. जवळपास सर्वच वयोगटांच्या लोकांमधे चहा प्रिय आहे.कट्टयावर, टपरीवर चहा पित पित चर्चा आणि वादविवाद करणारे अनेकजण आपण बघतो. वयोमानानुसार चर्चेचे विषय जरी वेगवेगळे असले तरी चहा हा दुआ समान असतो.मी चहा पीत नाही, मी फक्त कॉफी पितो/पिते, शी चहा काय असे म्हणणारे महाभाग भेटतात अशा लोकांपासून आम्ही दोन हात दूरच राहतो. खर तर अशा लोकांना ग्रुपमधे खुप शिव्या खाव्या लागतात ती गोष्ट वेगळी.
आत्ता आपण ज्याप्रकारे चहा उठताबसता पिऊ शकतो तस फार पूर्वी करण अशक्य गोष्ट होती. तेव्हा नुकताच चहा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला असावा. चहा या पेयाला प्रखर विरोधही झाल्याची नोंद इतिहासात सापडते. पुण्यातील पंचहौद मिशन चे चहा-ग्रामण्य प्रकरण तर इतिहासात चांगलेच गाजले होते.हरि नारायण आपटे यांनी आपल्या निवडक मित्रांना पाठविलेली चिठ्ठी अशी होती- उदईक दुपारी आमचेकडे श्रीस्वामी येणार आहे बरोबर शिष्यस्वामीही असतील तरी आपण अगत्य येण्याचे करावे.यातील श्रीस्वामी म्हणजे चहा आणि शिष्यस्वामी म्हणजे बिस्कीट.चोरीचा मामला आणि चहाला प्याला.(संदर्भ: जन-मन,लेखक अरुण टिकेकर) यावरुन लक्षात येईल कि पूर्वी चहा चारचौघात पिणे किती अवघड होते.हळुहळु चहा पेय जनमानसात स्थान निर्माण करु लागले आणि आतातर आपल्या जीवनाचा एक भाग बनून राहिले आहे. आता एक कटिंग, स्पेशल, एक मसाला चाय,अदरक डालके, अण्णा सिंगल अशे आवाज आपण जागोजागी ऐकतो. असं म्हणतात कि बायांनी कुंकवाला तर पुरुषांनी चहाला नाही म्हणू नये.इतकेच काय तर घरातल्या माणसाची ओळख किंवा त्यांचे संस्कार हे त्यांनी बनविलेल्या चहाच्या चवीनुसार ठरविले जातात. ब-याच दिवसांनी घरी सगळे एकत्र जमले की रात्री बाराला चहा झालाच पाहीजे, नाहीतर भेटल्यासारखे वाटत नाही. चहा हे एक अजब रसायन आहे. नुसते साखर आणि चहा टाकुन उकळवलेले पाणी नव्हे. तो उकळेपर्यंत वाट बघावी लागते.. गरम असताना त्याचा एकदम मोठा घोट घेतला तर जीभ भाजते. तो कलेकलेने आणि फुंकून फुंकूनच प्यावा लागतो. ज्याला हे जमतं तो आयुष्यात सुखी होतो. तुम्ही हे वाचायचे कष्ट घ्या तोवर मी आलोच एक कटिंग मारून.

good one!!!
ReplyDeleteखरा ‘चहा’टळ आहेस. युनिवर्सिटीचा चहावाला उगाचच आपली आठवण नाही काढत. भेटल्यावर नक्की ‘कटींग’ मारु.
ReplyDeletehow do small things make a big difference!!
ReplyDeletea small cup of tea, and a great day ahead!!
keep it up!
can u plzz write ur blogs in neutral lingo asin ENGLISH plzz it v diff fr me to read nd interpret...
ReplyDeletemast... khupch halaka phulka pan tarihi arthapurna....
ReplyDelete